Thursday, April 2, 2015

मेट्रो - 3चा जांगडगुंता....


मेट्रो 3 वरुन सध्या जोरदार वाद त्यापेक्षा राजकारण सुरु झाले आहे. एका राजकीय पक्षाने आघाडी उघडली म्हणून आपण मागे राहु नये यासाठी दुस-याने यामध्ये उडी घेतली असल्याचं चित्र आहे.  गिरगाव - काळबादेवी इथल्या लोकांचे होणारे विस्थापन आणि आरे कॉलनी यावरून सध्या वादप्रतिवाद होत आहेत. नशीब अजुन आणखी नव्या वादाची भर पडली नाही. एखाद्या मुद्द्यावर वाद होणे, विरोध करणे एकवेळ मान्य, मात्र मेट्रो 3 नकोच अशी भूमिका घेणे किंवा असा विचार करणे म्हणजे कपाळकरंटेपणाचे लक्षण आहे.

मेट्रो 3 मुळे वर्षानुवर्षे एका जागी राहिलेल्यांचे विस्थापन होत असेल तर त्याच जागी त्यांचे पुनर्वसन व्हायलाच हवे याबाबत दुमत नाही. म्हणून आंदोलन करुन हव्या त्या मागण्या, पाहिजे ते आपल्या पदरात पा़डून घेणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे,. 

मेट्रोच्या कारशेडमुळे आरे कॉलनी धोक्यात आली म्हणून सर्व राजकीय पक्ष बोंब ठोकत आहेत. मात्र हेच सर्व राजकीय पक्ष जीवघेण्या लोकल  प्रवासाच्या विरोधात, मुंबईतील वाढत्या प्रदुर्षणाविरोधात, अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांच्या विरोधात कधी एकत्रिरित्या आवाज उठवतांना कधी दिसले नाहीत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या भोवती बांधकामे वाढत असतांना, अतिक्रमण होत असतांना हे राजकीय पक्ष गप्प होते. मात्र आरे कॉलनी मध्ये झाडे तोडली जाणार म्हणून सर्वजण दंड थोपटून उभे आहेत. किमान आरे कॉलनीच्याबाबतीत तरी हा प्रकार हास्यास्पद आहे. 
  
म्हणूनच मेट्रो ३ ला विरोध न करता भविष्यातील मुंबईची वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेता त्याचे स्वागतच करायला पाहिजे. त्यामुळेच कधी नव्हे ते MMRC किंवा MMRDA चे अधिकारी मोठ्या प्रमाणात लोकांशी थेट संवाद साधतांनाचे चित्र बघायला मिळत आहे.   

मेट्रो ३ का महत्त्वाची...

1..मुंबईतील लोकल ट्रेन, बेस्ट बस, रिक्षा -टॅक्सी यांसारख्या सार्वजनीक वाहतूक व्य़वस्था क्षमतेपलिकडे प्रवाशांचा भार झेलत आहेत. यामध्ये  आणखी वाढ करणे अशक्य झाले आहे. म्हणूनच मेट्रोसारख्या आणखी एका सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा पर्याय निवडणे त्यापेक्षा तो उभा करणे अत्यंत आवश्यक आहे. 

२.. मेट्रो ३ चा मार्ग भुयारी असल्याने काही निवासी आणि व्यावसायिक ठिकाणे सोडली तर बांधकाम करतांना रस्ते आणि लोकल वाहतूकीला कुठलाही अडथळा येणार नाही.

३.. कफ परेड, नरीमन पॉईंट, फोर्ट, काळबादेवी-गिरगांव, वरळी, प्रभादेवी, वांद्रे-कुर्ला कॉम्पेल्क्स, विद्यानगरी, दोन्ही विमानतळ, सीप्झ असे  भाग जे रेल्वेशी-लोकल ट्रेनशी जोडले गेलेले नाहीत ते भाग मेट्रोने जोडले जाणार आहेत.   

४.. मेट्रो ३ चा मार्ग मध्य रेल्वच्या सीएसटीला, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, ग्रॅन्टरोड, मुंबई सेंट्रल, पहिल्या मेट्रोच्या मरोळ नाका,  प्रस्तावित मेट्रो २ च्या बीकेसीला आणि मोनोरेलच्या जेकब सर्कलला जोडणारा आहे. त्यामुळे  मुंबईच्या एका भागातून दुस-या भागातील प्रवास हा जलद होणार आहे. 

आधीच मोठ्या विलंबानंतर पहिल्या मेट्रो आणि मोनोचा मार्ग हे सुरु झाले, खरं तर मुंबईची गरज लक्षात घेता मेट्रोचे जाळे २००० पर्यंत प्रत्यक्ष वापरात येणे आवश्यक होते. मात्र जी चूक आधीच्या राजकीय पक्षांनी - नेत्यांनी, प्रशासन, शहररचनाकार यांनी केली ती आता करू नये किंवा आता तिच चुक होऊ नये असे वाटते. त्यामुळे मेट्रो -३ ला विरोध होत असला सर्वसामान्यांना विश्वासात घेऊन या प्रकल्पाचे काम सुरु करणे हे मुंबईकरांच्याच आणि मुंबईत पोटापाण्यासाठी येणा-या सर्वसामान्यांच्या हिताचे आहे. या मेट्रोचे काम सुरळित सुरु झाले तर पुढील मेट्रोचे आऱाखडे प्रत्यक्षात येतील, त्यांचा मार्ग मोकळा होईल.

#shivsena  
#mns  
#bjp  
#metro3 
#mmrda 
#mmrc
#mumbai


2 comments:

  1. Amit agadi khara ahe... Mitro 3 babat khup chhan mudde mandale ahes

    ReplyDelete
  2. Amitji..Very good explanation... We should think rationally rather than emotionally.

    ReplyDelete

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...